भुसावळातील रेल्वे स्थानक रस्त्याचे काम अखेर मार्गी : नगरसेवक कोठारींचा यशस्वी पाठपुरावा –

भुसावळ : भुसावळातील रेल्वे स्टेशन (Relway Station) रस्त्याची पालिका व रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे दुरुस्ती रखडल्याने वाहनधारकांसह रेल्वे प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत होता. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पालिकेने 50 टक्के निधी दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने काम करण्याची भूमिका घेतली होती मात्र रेल्वेचा 30 टक्के कचरा खेडी डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो व तेथील बायोमायनिंग प्रकल्पासाठी पालिकेने साडेतीन कोटी खर्च केले असून पर्यायाने यात लागलेला पैसा हा जनतेच्या कर स्वरूपातील आहे. रेल्वे प्रशासन रस्त्याचे काम करणार नसेल तर 30 टक्के म्हणून एक कोटी पाच लाख रुपये रेल्वेने पालिकेला द्यावेत, यांनी डीआरएम एस.एस.केडीया 7यांच्याकडे 28 ऑक्टोबर 2021 रोजी लेखी निवेदनाद्वारे करीत आंदोलनाचा इशारा दिला होता शिवाय पालिकेच्या सभेतही याबाबत विषय मांडला होता. कोठारींच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने स्टेशन रस्त्याचे बीबीएम केले असून लवकरच डांबरीकरण पूर्णत्वास येण्याची आशा आहे.
जागृक नगरसेवकाचा यशस्वी पाठपुरावा
विकासाचे व्हिजन असलेतरी की अशक्यप्राय बाब काहीच नाही, हे नगरसेवक पिंटू कोठारींनी भुसावळकरांना दाखवून दिले आहे. प्रभागातील विकासकामे असो की अडचणीतील नागरीक, कोठारी धावून आले नाही तर नवलच ! लॉकडाऊनमध्ये हजारो नागरीकांना मदतीचा हात देवून दातृत्वाचे ‘कोठार’ खुले करणार्‍या ‘निर्मल दातृत्वा’ ची महती एव्हाना भुसावळपार महाराष्ट्राभर पसरली आहे. भुसावळातील रेल्वे स्टेशन रस्त्यावरून राजकारण पेटले असतानाच कोठारींनी डंपींग ग्राऊंडचा मुद्दा शोधून काढत रेल्वेने कचर्‍यापोटी पालिकेला भरपाई द्यावी अन्यथा कचरा टाकू न देण्याचा इशारा दिला आणि हा इशाराच काम करून गेला. रेल्वेने नुकतेच स्टेशन रस्त्याच्या बीबीएम कामाला सुरूवात केली असून लवकरच डांबरीकरण होईल, अशी आस भुसावळकरांना आहे. रेल्वे प्रशासनाचे मंडल अभियंता (विशेष कार्य) उमेश खरात यांनी कोठारी यांना लिखीत पत्र पाठवून 20 जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली आहे. कोठारी यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर शहरातील रेल्वे स्थानक रस्त्याचा प्रश्न निकाली निघाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दातृत्वाचे कोठार खुलेच : हतनूरच्या पॉझीटीव्ह परीवारातील दोन निगेटीव्ह मुलींचा ‘ते’ करताय सांभाळ
भुसावळकरांच्या ऐतिहासीक सेवेचे गरजूंना आयुष्यभर स्मरण
या प्रश्नाने रेल्वे केले अंतर्मुख
गुरुवार, 28 आक्टोंबर 2021 रोजी नगरसेवक कोठारी (Pintu Kothari) यांनी डीआरएम केडीया यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले की, रेल्वे विभागातून दररोज निघणारा किमान 15 टन कचरा पालिकेच्या खेडी शिवारात असलेल्या डंपींग ग्राऊंडवर टाकला जातो. पालिकेने या डंपींग ग्राऊंडवर बायोमायनिंग करण्यासाठी 3.5 कोटी रुपये निधी खर्च केला आहे. रेल्वेच्या कचर्‍यावर पालिकेने हा खर्च का करावा? यामुळे रेल्वे प्रशासनाने या झालेल्या खर्चापोटी 30 टक्के रक्कम अर्थात 1 कोटी 5 लाख रुपये पालिकेला द्यावे, अशी अपेक्षा कोठारी यांनी व्यक्त करीत जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला. हजारो प्रवासी रेल्वे हद्दीतील स्टेशन रस्त्यावरून प्रवास करतात मात्र रेल्वे प्रशासन या रस्त्यासाठी निधी खर्च करायला तयार नाही तर दुसरीकडे नागरीकांच्या खर्चातून तयार झालेल्या बायोमायनिंग प्रकल्पात रेल्वेचा 30 टक्के कचरा येत असल्याने त्याची खर्चाची झळ भुसावळकरांनी का सोसावी ? असा सवाल कोठारी यांनी उपस्थित करीत रेल्वे प्रशासनाला अंतर्मुख केले व त्यानंतर रेल्वेने कामाची दखल घेतली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.