भुसावळ (प्रतिनिधी )-
केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या अमृत योजनेच्या कामाला भुसावळातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मंगळवार २० पासून प्रारंभ झाला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ केला. यावेळी महेंद्र सुराणा, कांतीलाल चोरडीया, प्रदीप नेवे, सुरेश जैन, बंडू गोराडकर, पवन नाले, यतीन पाटील, सदानंद वराडे, बबलू बाणाईत, मयूर चौधरी, प्रेमचंद जैन आदी उपस्थित होते.



