भुसावळ (प्रतिनिधी ) –
प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचे अत्यंत महत्त्व आहे गुरु आपल्या जीवनाला योग्य मार्गदर्शन देतात . गुरूंच्या सानिध्यात आपले व्यक्तिमत्व घडत असते . गरज असते ती श्रद्धेची गुरुप्रती श्रद्धा असेल तर ज्ञानार्जन सहज सोपे होते . त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात गुरु करणे आवश्यक आहे गुरूंच्या सानिध्यामुळे आयुष्यातील प्रत्येक दिवस हा उत्सव होत असतो असे मत श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सोनुभाऊ मांडे यांनी व्यक्त केले निमित्त होते महाराणा प्रताप विद्यालय व अहिल्यादेवी कन्या विद्यालय या दोन्ही शाळा व शाळेतील पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित गुरुवंदना कार्यक्रमाचे .

गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना आपल्या प्राचीन संस्कृतीचा संस्कार व्हावा या हेतूने दरवर्षी विद्यार्थी शिक्षकांना वंदन करून गुरु पौर्णिमेचा उत्सव साजरा करीत असतात.. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती माता तसेच महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला विद्यार्थ्यांनी या वेळेस ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.. महाराणा प्रताप विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर गुरुवंदना सादर करून मंत्रमुग्ध वातावरण निर्माण केले..
विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दरूपी मनोगतातून गुरूबद्दलचा आदर व्यक्त केला . वरद फेगडे , आदर्श कोकणे , जिगीषा निकम , आकांक्षा नाले इत्यादी विद्यार्थ्यांनी तर शिक्षकांमधून श्री आशिष निरखे सर यांनी मनोगत मांडले .
कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष श्री सोनुभाऊ मांडे ,कार्यकारणी सदस्य श्री श्रीधर खनके, श्री भागवत वानखेडे , महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुरेश शिंदे , अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते
प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ सुरेखा चौधरी यांनी तर सूत्रसंचालन सौ पल्लवी पाटील यांनी व आभार पालक सदस्य श्री निलेश चौधरी यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या दोन्ही शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींचे सहकार्य लाभले .



