रावेर
रावेर तालुक्यातील आदिवासी भागातील जिन्सी तांडा येथे वादळी पावसामुळे शेतमजुरांच्या अंगावर वीज कोसळल्याने एकाच घरातील 10 शेतमजूर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती.
याबाबतची माहिती मिळताच जखमी असलेल्या शेतमजुरांच्या कुटुंबियांची भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी भेट घेत त्यांना आधार दिला. यावेळी स्थानिक नागरीकांनी वादळामुळे झालेल्या नुकसानीच्या त्यांच्याकडे व्यथा मांडल्या.



