भुसावळ (प्रतिनिधी ) –
सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे ३० दरवाजे उघडले असून २८७३ क्युमेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासन जळगाव यांनी दिला
आहे .



