भुसावळमध्ये वर्षावास प्रवचनमालेस सुरुवात १२ बौद्ध विहारांत धम्मचर्चा –

भुसावळ ( प्रतिनिधी )) – भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा दरम्यान १२ बौद्ध विहारांमध्ये वर्षावास प्रवचनमालेला सुरुवात करण्यात.

भुसावळ येथील मैत्रेय बुद्ध विहार, नालंदा नगर येथे उद्घाटन जिल्हाध्यक्ष आयु. प्रियांका अहीरे यांच्या हस्ते, तर मार्गदर्शन जिल्हा सचिव व समता सैनिक दलाचे लेफ्टनंट कर्नल आयु. युवराज नरवाडे यांनी केले.या प्रसंगी प्रवीण डांगे, सिमा अहीरे, प्रतिभा सोनवणे, रेखा गायकवाड, सुरेखा नरवाडे आदी उपस्थित होते. तसेच राहुल नगर येथील आनंद बुद्ध विहार, फेकरी येथील तक्षशिला बुद्ध विहार, जळगाव रोडवरील धम्मनगर आणि चांदमारी चाळ येथील शीलरत्न विहारातही प्रवचनमालेचे उद्घाटन करण्यात आले.उपक्रमात महिलांचा विशेष सहभाग असून, धम्मग्रंथ पठण आणि प्रवचन रविवारपर्यंत नियमित होणार आहेत. कार्यक्रम राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि राज्य सचिव के. वाय. सुरवाडे गुरुजी व गोरव पवार गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.