भुसावळ – वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार दिपक धिवरे यांच्या दालनात लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक १४ ऑक्टोंबर २०२१ गुरुवार रोजी दुपारी १२.३० वाजता तहसील कचेरी येथे
कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांना निराधार महिलांना तात्काळ अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिटिंग संपन्न झाली.
मिटिंग मध्ये लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी मुद्दे मांडले .भुसावळ ग्रामीण व शहरात कोरोना मुळे पती ,मुलगा गमावलेल्या निराधार महिला व एक पालक वा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्व्हे करावा , अश्या निराधार महिलांना तात्काळ अन्न सुरक्षा योजनेचा लाभ, निराधार पेन्शन योजना , तहसील कचेरीवर कुटुंब सहाय्य योजने अंतर्गत २० हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत , ज्या महिलांकडे आपल्या पतीच्या मृत्यू नंतर कागदपत्र उपल्ब्ध्द नसतील तर तात्काळ कॅम्प लावून दाखले व संबंधित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावेत , एकल महिलांकडे कुठले कौशल्य असल्यास त्यांना संबधित विभागाच्या योजना मिळवून देण्याची शिफारस “वात्सल्य समितीने “ करावे , समृध्द गाव विकास योजना मनरेगा अंतर्गत योजनांचा लाभ देण्यात यावा , ज्या महिलांच्या कडे शेती आहे त्यांना शेती पूरक उद्योगांना अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळावे , सुप्रीम कोर्टाच्या निकाला प्रमाणे सर्वाना ५० हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे , जळगाव ग्रामीण व शहरात एक पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ बाल संगोपन अनुदान महिना १२५० रुपये देण्यात यावे व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ ५ लाख रुपयाची मदत देण्यात यावी.
या बैठकीला तहसीलदार दिपक धिवरे यांच्या सोबत , ग्रामविकास अधिकारी ,लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे ,कार्यकर्ता सुप्रिया चव्हाण ,तेजस्विता जाधव यांच्या सह कोरोना मुळे विधवा झालेल्या एकल महिला व भुसावळ ग्रामीण व शहरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी, दिपक काटे, हेमंत पाटील सीडीपीओ आर. के. गायकवाड, संजय गांधी निराधारच्या एस आर घुले, शहरी अंगणवाडी मुख्य सेविका व्ही पी सावळेकर, आर.पी फेगडे पंचायत समिती, रेशनिग विभाग विलास पाटील ई.अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .
प्रसंगी तहसिलदारांनी गावनिहाय सर्व्हे आठ दिवसात पूर्ण करण्याचे व सर्वाना रेशनीग व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देत पुढील दर १५ दिवसातून एकदा मिटिंग घेण्याचे आश्वासन देत मिटिंग सर्वांचे आभार मानत संपन्न झाली .



