स्व.जगदेवरामजी यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकाचे विमोचन – कोणत्याही कामाला ईश्वरीय कार्य समजणारे , उत्तम संघटक अशी ख्याती जगदेवरामजी यांची होती – प्रमुख वक्ते किशोर चौधरी.

भुसावळ – 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विशेष दिनी अ.भा .वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवरामजी उंराव यांच्या जीवन चरित्र वरील पुस्तकाचे विमोचन कन्या शाळा भुसावळ सर्व मान्यवर व उपस्थितांच्या साक्षीने करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ. सुषमाताई खानापूरकर यांनी भूषविले, तर प्रमुख वक्ते म्हणून श्री किशोर चौधरी सर हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रल्हाद सिंग पावरा सहाय्यक प्राध्यापक यावल हे होते श्री रामानंद जी काळे प्रांत प्रचारक हे उद्घाटक म्हणून लाभले होते. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांनी दीप प्रज्वलन व माल्याहार अर्पण करून केली.अ.भा. वनवासी कल्याण आश्रमाचा परिचय डॉ किशोर मोरे यांनी प्रास्ताविकातून करुन दिला.


कार्यकर्त्यांमध्ये रमणारे उत्तम संघटन कौशल्य असणारे साधा सरळ स्वभाव यामुळे सर्वांचे लाडके असणारे जगदेव रामजी पंचवीस वर्ष अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पाच भाषांवर प्रभुत्व जनजाती समाजाशी त्याच्यांच भाषेत संवाद साधणारे जगदेव रामजी होते.असे प्रमुख वक्ते किशोर चौधरी आपल्या प्रमुख मनोगतातून बोलले. शिक्षणाशिवाय प्रगती नाही म्हणून ग्रामीण भागात विशेष म्हणजे जनजाति समाजात शिक्षणाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे व आदिवासी रूढी परंपरा संस्कृती जोपासण्याची चे कार्य शिक्षित आदिवासी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन प्रल्हाद पावरा यांनी केले.
उद्घाटक श्री रामानंद जी काळे म्हणाले परिस्थितीनुसार स्वतःला व वातावरणानुसार स्वतःमध्ये बदल करून घेण्याचे उत्तम लक्षण जगदेवरामजी यांच्या मध्ये होते. या भारतीय संस्कृती ची जपणुक करण्यात त्यांचे योगदान मोलाचे होते , अध्यक्षीय भाषणात सुषमाताई यांनीशबरी माता यांचे उदाहरण दिले . श्रद्धा सबुरी ठेवली म्हणून शबरीला श्रीरामाचे दर्शन झाले. कल्याण आश्रमाच्या वतीनेनेहमी चांगले कार्य होत राहो अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या ‌. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे परिचय काशीराम बारेला सर यांनी करून दिला.‌.
यावेळी व्यासपीठावर डॉ किशोर मोरे, डॉ नीलेश भिरुड, यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड जास्वंदी भंडारी(पाटील) यांनी केले.
कार्यक्रमाला विठ्ठलजी मैयकलवाड , मधुकर वाणी, ॲड चित्र आचार्य, वीरसिंग वसावे, ॲड निलेश भंडारी व जनजाती समाजातील स्वयंसेवक ,श्रोते उपस्थित होते.कार्यक्रमाची ऋणनिर्देशनाची जबाबदारी ॲड जयश्री ताई देशमुख यांनी पार पाडली. सर्व कार्यकर्ते व स्वयंसेवक यांच्यामुळे कार्यक्रम यशस्वी पार पाडला.