भुसावळ न.पा. ला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या.. शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगावजिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्युदर अतिशय चिंतनीय आहे. त्याच्यात भुसावळचा मृत्यूदर आणि कोरोना रुग्णांची संख्या ही अतिशय भयावह आहे. भुसावळ शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आणि अशातच सातत्याने चर्चेत असलेल्या भुसावळ नगरपालिकेमध्ये आज पावेतो. भुसावळ शहराला एकही सक्षम कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी कायम लाभलेले नाहीत व टिकले नाहीत. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उदासीनतेमुळे आज पर्यंत याना त्या कारणामुळे कोणीही मुख्य अधिकारी सक्षम रित्या भुसावळ शहराला शहराच्या विकासाला गती देण्यासाठी जनतेच्या समस्या तक्रारी व मूलभूत समस्या सोडविण्यात यशस्वी ठरलेले नाहीत. कोरोनाच्या संक्रमणाच्या संकट काळामध्ये भुसावळ शहराची स्थिती बिकट असताना तत्कालीन मुख्याधिकारी श्रीमती करुणा डहाळे त्यांच्याविषयी अनेक तक्रारी होत्या तसेच त्या भुसावळ शहरात वेगाने फैलाव होणाऱ्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी तसेच जनतेच्या मूलभूत सोडवण्या मध्ये त्या पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी जळगाव डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले होते. त्यांच्या जागेवर प्रभारी म्हणून काही दिवसांपूर्वी किरण सावंत पाटील उपजिल्हाधिकारी यांनी तो पदभार स्वीकारला होता. त्यांनी किरण पाटलांनी हा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या काळात पालिकेच्या पथकांनी बाजारात व्यापक कारवाई करून गर्दी कमी केली होती. त्यामुळे बाजारात बर्‍यापैकी फिजिकल डिस्टन्सिंग शिस्त लागली होती. परंतु ते सुद्धा रजेवर गेल्यामुळे भुसावळ शहराला चोपड्याच्या नगरपालिके चे मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे साहेब यांच्याकडे आता सध्या भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. चे मुख्याधिकारी फक्त आठवड्यातून दोन दिवस भुसावळ शहराला देणार आहेत. त्यामुळे जर अशीच पद्धत चालू राहिली तर कायमस्वरूपी मुख्याधिकारी भुसावळ शहराला मिळाला नाही. आधीच अविकसित असणाऱ्या व कोरोना विषाणू च्या विळख्यात असणाऱ्या भुसावळ शहरातील नियोजन 100% ढासळेल. तसेच येणाऱ्या पावसाळ्यात होणारे साथीचे आजार नालेसफाई रस्त्यांच्या समस्या, स्वच्छतेच्या समस्या वगैरे मूलभूत समस्या आधीपेक्षा शंभर पटीने जास्त प्रमाणात उद्भवतील.त्यामुळे भुसावळ करायची चिंता अजून वाढू शकते. हे अतिशय भयावह असेल. भुसावळकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे अतिशय घातक ठरू शकते. म्हणून भुसावळ शहराला शहराच्या विकासासाठी, करुणा विषाणू च्या प्रतिकूल परिस्थितीला योग्यरीत्या नियोजनबद्ध सांभाळून भुसावळ नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यासाठी भुसावळकरांना भय मुक्त करण्यासाठी, बहुत असताना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी, तसेच भुसावळ शहराच्या मूलभूत सुविधांचे आदर्श नियोजन करण्यासाठी, भुसावळ नगरपरिष देला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नेमावा अशी मागणी प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार व प्रसार अभियानाचे जळगाव जिल्हाध्यक्ष शिशिर जावळे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *