वरणगाव(प्रतिनिधी ) –
कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यात अन्न सुरक्षा योजनेतून नागरिकांना 5 किलो प्रतिव्यक्ती मोफत तांदूळ वितरणास वरणगाव येथे आज २१ एप्रिल मंगळवार पासून सुरवात झाली.
राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातून पारदर्शकपणे धान्य तांदूळ वितरण होते किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखली सकाळी १० वाजेपासून वरणगाव शहरातील स्वतः धान्य दुकानावर जाऊन आढावा घेतला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, शहराध्यक्ष संतोष माळी, नगरसेवक विष्णू खोले, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, युवक शहराध्यक्ष प्रशांत मोरे, पवन मराठे, सुमित चौधरी, गजानन वंजारी, राजेश चौधरी, पप्पू जकातदार यांनी दुकानावर जाऊन मोफत वितरण होणाऱ्या तांदूळ नागरिकांना मिळतो आहे किंवा नाही याची चौकशी करून आढावा घेतला.
बऱ्याच नागरिकांची नावे दुसऱ्या दुकानदाराकडे वर्ग झाल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गावातील बऱ्याच नागरिकांना स्वस्त धान्य दुकानाच्या पुस्तकांवर(शिधा पत्रिका ) वितरणाचा शिक्का नसल्याने त्यांना धान्य मिळत नसल्याची ओरड आहे. अशा नागरिकांची यादी तयार करून राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करून त्यांचे धान्य सुरु करण्याचे आश्वाशन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी नागरिकांना दिल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.



