भुसावळ (प्रतिनिधी )-
सीएए व एनआरसी रद्द व्हावा या मागणी करिता येथे तहसील कार्यालयासमोर 19 व्या दिवशी थाली नाद आंदोलन करण्यात आले . गवळी समाज बहुदेशीय संस्था शिरपुर कन्हाळा तर्फे जाहीर पाठीबा देण्यात आला आहे . दीनांक 5 बुधवार रोजी संविधान बचाव समीती तर्फे थाली पिटो आंदोलन करण्यात आले .यावेळी थाळी वाजवीत घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले .
या प्रसंगी गवळी समाज शिरपुर कन्हाळा चे माजी सरपंच महंमद चॉंन्द भाई गवळी, रमजान गवळी, तसेस प्रा. सुरवाडे सर, नगर सेवक सलीम पिंजारी समीती चे साबीर मेंबर, सलीम भाई, मो मुनंव्वर खान, युनुस मामा, ईम्रान खान, अशरफ कुरेशी, दानीस, कुफरान भाई, सलीम भाई, महमद हुसेन गवळी पेश ईमाम खव्वाॉजा सुन्नी मस्जीद चे व शिरपुर कन्हाळा येथील गवळी समाजाचे अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते या नंतर तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले .



