मुंबई – दिवसेंदिवस रस्त्यावरील खाद्यपदार्थ बनवण्याची पद्धत आणि त्यांची स्वच्छता या दोन्ही गोष्टींची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. आजच्या घडीला अनेक लोक आवर्जून स्ट्रीट फूड खायला जातात. उन्हाळ्यात तर स्ट्रीट फूडचे प्रमाण जास्त असते. त्यात घशाला थंडावा देणाऱ्या गोष्टी फक्त लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही आवर्जून खातात. मात्र आता एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, जी पाहून तुम्ही स्ट्रीट फूडचे सेवन करताना कायम विचार कराल.

राजस्थान मध्ये जवळपास 7 मुलांचा पेप्सीचे सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील सरूपगंजजवळील फुलाबाई खेडा येथील बालकांच्या मृत्यूचे कारण शोधण्यात ब्लॉक, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय वैद्यकीय पथके गुंतलेली आहेत. प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये विकली जाणारी पेप्सीचा याचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. गंजलेल्या भांड्यांमध्ये बर्फ साठवून ही पेप्सी तयार केली जाते तसेच त्यात विविध प्रकारचे खाण्यायोग्य नसलेले रंग आणि पाणी वापरले जाते, त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर मोठा गंभीर परिणाम होतो. जीवसुद्धा जाऊ शकतो.
या 7 मुलांच्या मृत्यूनंतर अजून 2 मुले आजारी पडली. सकाळच्या सुमारास प्लॅस्टिकच्या पाईपमध्ये विकले जाणारे शीतपेय अर्थात पेप्सी खाल्ल्याने मुलांची प्रकृती खालावल्याचे मुलांच्या कुटुंबीयांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
मुलांच्या मृत्यूनंतर गावात वैद्यकीय संघ घरोघरी सर्वेक्षण करत आहे. पीडिताचे कौटुंबिक सदस्य ताराराम जोव्हा म्हणाले की तीन मुले त्यांच्या कुटुंबात एकत्र मरण पावले. तीन मुले थकल्यासारखे, अशक्तपणा आणि रक्त उलट्या होतात. मात्र, मृत्यूच्या कारणांबद्दल त्यांना कोणतीही माहिती नाही. नफ्यासाठी अशा पद्धतीने 2 रुपयांची ‘पेप्सी’ बनणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.


