अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सातपुड्यात ४५० जणांना फराळासह नवीन कपडे वाटप; सातपुड्यातील जामुनझिरा येथे राबविला उपक्रम.


भुसावळ (प्रतिनिधी)-
भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात अाली. त्यात १२५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, शैक्षणिक साहित्य,स्वच्छते साठी साबण आणि जिल्हा परिषद शाळेसाठी आरो ( वाटर पुरीफायर ) वाटप करण्यात अाले.
दीपाेत्सवाच्या निमित्ताने अंतर्नाद तर्फे ‘एक वाटी फराळ व नवीन कपडे द्या अाणि वंचितांची दिवाळी गाेड करू या’ असे अावाहन करण्यात अाले हाेते. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या उपक्रमांतर्गत गाेळा करण्यात अालेले साहित्य व फराळ यावल तालुक्यातील जामुनझिरा येथील अादिवासी पाड्यात वाटप करण्यात अाला.
उपक्रमाचे दाते
रवींद्र निमाणी, नगरसेवक मुकेश पाटील, दिलीप सूर्यवंशी,युवराज लोणारी, प्रशांत तायडे, निलेश कोल्हे, ललित पाटील, हर्षद महाजन, किशोर पाटील, रघुनाथ सोनवणे, डॉ.नीलिमा नेहते, हरीश फालक, रमेश सरकटे, कांतीलाल पाटील, दशरथ पाटील, मंगलेश पाटील, श्रीकांत मोटे, ज्योती साठे, सरला पाटील, सुरेश न्हावकर, भाग्यश्री भंगाळे, सचिन पाचपांडे, रवि राजपूत, परिक्षीत बऱ्हाटे, प्रकाश कासार,क्रांती सुरवाडे,ज्ञानेश्वर मोरे, एच टी फेगडे, परिक्षीत चव्हाण, सलीम शेख, जे डी महंत, विजय सोनवणे, बी एन पाटील, पवन कलापुरे, नरेंद्र पाटील, महेंद्र किनगे, विकास वारके, संदिप पाटील, विलास बेंद्रे, दिलीप चौधरी, मयुर कोळी, शरद हिवरे, शरद गाढे, संदिप बोरोले, शशिकांत राणे, वसंत सोनवणे, प्रवीण पाटील, छाया पाटील,दिपक जावळे, विनोद चोरडीया, के टी तळेले या दात्यांचे सहकार्य लाभले. प्रकल्प प्रमुख योगेश इंगळे समन्वयक जीवन सपकाळे तर सह समन्वयक हरीश भट हे हाेते. श्रीकांत जाेशी,ज्ञानेश्वर घुले, देव सरकटे, प्रसन्ना बाेराेले,शशिकांत येवले, आरीफ तडवी, पांडुरंग महाजन, गणेश जावळे, समाधान जाधव, प्रदीप साेनवणे, जीवन महाजन, प्रा. श्याम दुसाने, संजय भटकर, निवृत्ती पाटील, भूषण झाेपे, मंगेश भावे,अमित चाैधरी,अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, राजू वारके, हेमंत बोरोले, राजेंद्र जावळे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, संदीप सपकाळे अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते.

चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य
अंतर्नादतर्फे गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात अाहे.पाड्यावरील चिमुकल्यांना नवे कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले हाेते. वाड्या-वस्त्यांवरील कुटुंबीयांसाेबत दिवाळी साजरी केल्याचा अानंद हा शब्दातीत अाहे, अशी भावना अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

उप्रकाला मिळाले व्यापक स्वरुप
‘वाटीभर फराळ अाणि कपडे द्या’ या उपक्रमाला यंदा दात्यांकडून जाेरदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे त्यास व्यापक स्वरुप मिळाले. भविष्यात हा उपक्रम लाेकचळवळ व्हावा, या अनुषंगाने प्रयत्न करू, अशी ग्वाही प्रकल्पप्रमुख योगेश इंगळे, समन्वयक जीवन सपकाळे, सह समन्वयक हरीश भट यांनी दिली. शहरी लाेक पाड्यावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात याचा अानंद असल्याची भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *