उत्तराखंड घटनेत पाळधीचे तेरा तरुण अद्याप बेपत्ता पालकमंत्री गुलाबराव पाटील तात्काळ दिल्लीला : शहरतील तिघे सुरक्षित मात्र संपर्क नाही

जळगाव – पाळधी/-

उत्तराखडंच्या धारली गावात काल ढगफुटी झाली आणि एका क्षणात सगळंच उध्वस्त झालं. पुराचं पाणी गावात शिरलं आणि एकच हाहा:कार माजला. यामुळे आत्तापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण चिखलात, ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त आहे. धारली गावासह अनेक ठिकाणी ढगफुटीचा फटका बसला असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक पर्यटक, भाविक सध्या उत्तराखंडमध्ये असून या ढगफुटीमुळे, दुर्घटनेमुळे ते तिथेच अडकले आहेत. त्यात जळगाव सह पुणे, सोलापूर, नांदेड असा विविध भागातील लोकांचा समावेश आहे.

पाळधी येथील माळी वाडा परिसरातील 13 युवक व चालक व चालकाचा साथी हे मित्र परिवार 27 जुलै रोजी पाळधी येथून टेम्पोट्रॅव्हल गाडी क्रमांक 19 सी वाय 2202 ने निघाले होते. मात्र आजपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शेवटचा संपर्क दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी झाला होता. त्या नंतर त्या युवकांचा संपर्क आता पर्यंत होऊ शकत नसल्यामुळे त्या युवकांचा परिवार चिंताग्रस्त आहे. ही बातमी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांना कळल्याने पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील तातळीने दिल्लीला रवाना झाले असून आपत्कालीन कक्ष यांच्याशी सतत संपर्क साधत आहेत. मंत्री मोहदय आज रात्री दिल्लीहुन उत्तर काशी येथे रवाना होणार असून पालकमंत्री व पाळधी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांचे संपर्क होण्यासाठी जोरदार प्रयन्त सुरू आहे.

संपर्क होत नसलेल्या युवकांची नावे

रोहन दिनेश माळी
रोहित बंडू माळी
मनोज संजय चौधरी
ज्ञानेश्वर संजय माळी
दिपक रत्नाकर सोनार
संगदीप भारत नंनवरे
दीपक माळी
वैभव गंगवने
संदीप माळी
विशाल पाटील सुरत
रिंकेश खुशाल माळी
भूषण सुरेश माळी
पवन माळी
जळगावचे नागरिक सुखरूप..

उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्यानगर जळगाव येथील असून सर्व तीनही भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. परंतू मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार उत्तरकाशी येथील एका स्टे हाऊसशी जिल्हा नियंत्रण कक्षाचे संपर्क केला असता सदर मेहरा कुटुंबातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा, रुपेश मेहरा – हे उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्या नगर जळगाव येथील असून सर्व तीनही भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. सदर भाविकांचे वडील श्री चंद्रशेखर नरवरिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कशात आले असता त्यांचा उपरोक्त स्टे हाऊस मालकाशी संपर्क करून दिला आहे.

पाचोऱ्यातील जवान बेपत्ता

दरम्यान उत्तर काशी दुर्घटनेत पाचोरा येथील एक जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. पाचोरा येथील जवान सोपान अहिरे हे उत्तराखंड येथील हर्षल गावात कर्तव्यावर असताना बेपत्ता झाले आहेत. त्याच्याशी संपर्क होत नसल्यामुळे परिवार चिंतेत सापडला आहे.

तसेच आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील 1990 सालच्या 10 वी च्या बॅचमधील 8 पुरुष आणि 11 महिलांचा एक समूह पर्यटनासाठी 1ऑगस्ट रोजी उत्तराखंडला रवाना झाला होता. या सर्वांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला असल्याची माहिती समोर आली आहे. काल सकाळी या समूहातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी त्या परिसरात काही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आल्याने त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक सर्वांनाच काळजी वाटू लागली.

विशेष म्हणजे, हा सर्व समूह त्या भागातच असल्याचे सांगितले जात आहे. काल या समूहातील एका महिलेने तिच्या मुलाला कॉल करून “आम्ही सर्वजण सुखरूप आहोत, ” असे सांगितले होते. मात्र त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. स्थानिक प्रशासन, उत्तराखंड पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा या प्रकरणाचा तपास घेत असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

उत्तराखंडला पर्यटनासाठी गेलेले सोलापुरातील चार तरुणही तेथे अडकले आहेत. काल सकाळी 11 वाजता या तरुणांनी कुटुंबियांशी संपर्क करत गंगोत्री येथे असून सुखरूप असल्याचे सांगितले होते. मात्र त्यानंतर कालपासून चौघांचेही फोन लागत नसल्याने कुटुंबिय चिंतेत आहेत. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे असे या अडकलेल्या चौघांची नावे आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या चौघाची माहिती मिळवण्यासाठी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. NDRF ने सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या माहितीनुसार जीवितहानी झालेल्या मध्ये सोलापूरच्या कोणत्याही व्यक्तीचा समावेश नसल्याचे सांगितलं. चौघा तरुणांच्या शोधासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

नांदेडचे 11 पर्यटक उत्तरकाशी येथील खराडी गावात सुरक्षित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्क कार्यालयाने पर्यटकांशी संवाद साधला आहे. तसेच नांदेड जिल्हा प्रशासन 11 प्रवाशांच्या संपर्कात आहे. काल दुरावलेले पर्यटक आज एकत्र आले. कोणीही काळजी करू नये, आम्ही सुखरूप आहोत अशी माहिती सचिन पत्तेवार यांनी दिली.