भुसावळ –
शहरातील टिंबर मार्केट ते आराधना कॉलनीला जोडणार्या रेल्वे लाइनखालील बोगद्याचे काम पूर्णत्वास असले तरी अॅप्रोच रोडचे काम रेंगाळले आहे. यामुळे सुमारे 20 हजार रहिवाशांना शहरात फेर्याने ये-जा करावे लागत असल्याने आमदार संजय सावकारे यांनी भुसावळचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या चर्चा केली. काम लवकरच पूर्ण केले जाईल असे आश्वासन डीआरएम गुप्ता यांनी आमदारांना दिले.



