छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ५१०० पोस्टकार्ड सजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला गेला.
भारतीय रेल्वेला या अनोख्या उपक्रमाचा एक भाग असल्याचा अभिमान आहे.

भारताने सर्वात जास्त ५,१०० पोस्टकार्डसह तयार केलेल्या वाक्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आणि मागील रेकॉर्ड धारक चीनला मागे टाकले.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हा कार्यक्रम झाला, जिथे चालणाऱ्या पायांच्या आवाजात, ट्रेनच्या घोषणात आणि कडाक्याच्या उन्हात, भारताने पोस्टकार्ड सह बनवण्यात आलेल्या विश्वाच्या सर्वात मोठ्या वाक्यासाठी एक नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करून चीनला मागे टाकले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, यूनेस्को (UNESCO) जागतिक वारसा स्थळ आणि मध्य रेल्वेचे मुख्यालय, जे भारतातील सर्वाधिक छायाचित्र काढण्यात येत असलेली ऐतहासिक वर्किंग हेरिटेज संरचना आहे, आता पोस्टकार्डसह तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या वाक्यासाठी नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा अविभाज्य भाग आहे.
वाक्यांश तयार करण्यासाठी ५,१०० पोस्टकार्डसह नवीन रेकॉर्ड स्थापित केला गेला.
“सबमें राम…शाश्वत श्री राम।“ ५२ समर्पित स्वयंसेवकांचा सहभाग असलेल्या या प्रयत्नाला ९ तास ३० मिनिटे लागली.
मागील विक्रम शांघायमधील फ्रिसलँड कॅम्पिना (चीन) कडे होता, ज्याने दि. २२ सप्टेंबर २०२१ रोजी १,३५२ पोस्टकार्ड वापरून एक वाक्य तयार केले होते आणि २० सहभागींसह ते पूर्ण करण्यासाठी १६ तास लागले होते.
हा रेकॉर्ड तयार करणारा कार्यक्रम भारतीय संस्कृती, कला आणि साहित्यासाठी मोठ्या उत्सवांच्या मालिकेचा एक भाग आहे, या आठवड्यात मुंबईत एका भव्य आणि सर्वसमावेशक उत्सवाचा समारोप झाला. भारतीय रेल्वे आणि इतर संस्थांद्वारे समर्थित तीन दिवसीय महोत्सवात भारत आणि विदेशातील नामवंत साहित्यिक व्यक्ती, कलाकार आणि मान्यवरांच्या सहभागासह साहित्यिक परिसंवाद, दृश्य कला आणि परफॉर्मिंग आर्ट्स सादर होतील.
हे पर्व भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्याचा आणि समकालीन संदर्भात भावी पिढ्यांसमोर सादर करण्याचा अनोखा प्रयत्न दर्शवतो याबद्दल भारतीय रेल्वेला त्याचा एक भाग असल्याचा अभिमान आहे.



