स्वच्छता अभियान‎: 13 शासकीय कार्यालये चकाचक; 12 टन कचरा संकलित‎ , डॉ. नानासाहेब धर्माधिकारी‎ प्रतिष्ठानचा उपक्रम‎

भुसावळ -महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब‎ धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी‎ वर्षानिमित्त शहरातील श्री सेवकांनी‎ रविवारी शासकीय कार्यालयासह‎ प्रमुख रस्त्यांवर स्वच्छता अभियान‎ राबवले. या उपक्रमात शहरातील १३‎ सरकारी कार्यालयांसह प्रमुख‎ रस्त्यांची स्वच्छता करुन तब्बल‎ १२.५५ टन कचऱ्याची विल्हेवाट‎ लावण्यात आली.‎ स्वच्छता दूत पद्मश्री‎ डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.‎ सचिन धर्माधिकारी यांच्या‎ मार्गदर्शनामध्ये महाराष्ट्र भूषण‎ डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या‎ जन्मशताब्दी वर्षानिमित्त भुसावळ‎ विभागात वर्षभर विविध कार्यक्रम‎ राबवण्यात येणार आहेत. त्याचाच‎ एक भाग म्हणून रविवारी शहरात‎ २९७ सेवकांनी स्वच्छता अभियान‎ राबवले. प्रमुख रस्त्यांसह १३‎ शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छता‎ केली. सकाळी ७ ते ११‎ वाजेदरम्यानच्या १२.२५ टन कचरा‎ संकलित करुन डंपिंग ग्राउंड-पर्यंत‎ विल्हेवाट लावण्यात आली. डॉ.‎ नानासाहेब धर्माधिकारी‎ प्रतिष्ठानमार्फत रक्तदान शिबिर,‎ वृक्ष लागवड व संवर्धन, पाणपोई,‎ जलपुनर्भरण, आरोग्य तपासणी‎ शिबिर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन‎ शिबिर, जलाशयांमधील गाळ‎ काढणे, बस थांबे निर्मिती असे‎ उपक्रमही राबवण्यात येतात.‎ ‎ भुसावळ श्री सेवकांनी व चोपडा‎ येथेही अभियान राबवले.‎ भुसावळात २९७ तर चोपडा येथील‎ ९९ अशा एकूण ५२६ श्री सदस्यांनी‎ त्यात सहभाग घेतला. या उपक्रमात‎ भुसावळातील १३ व चोपडा येथील‎ ६ असे एकूण १९ सरकारी कार्यालय‎ व २१ किमी रस्त्यांची स्वच्छता‎ करण्यात आली.‎

यावल शहरातही स्वच्छता‎ अभियान राबविले
यावल । शहरात रविवारी‎ डॉ.नानासाहेब धर्माधिकारी‎ प्रतिष्ठानच्या वतीने सर्वत्र स्वच्छता‎ अभियान राबवण्यात आले.‎ डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या‎ जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रतिष्ठानच्या‎ १२६ श्री सेवकांनी हा उपक्रम‎ राबवला. यात सर्व प्रशासकीय‎ कार्यालयांचा परिसर आणि‎ सार्वजनिक रस्ते स्वच्छ करण्यात‎ आले. रविवारी सकाळपासून‎ प्रतिष्ठानच्या श्री सेवकांनी स्वच्छता‎ अभियान हाती घेतले. त्या अंतर्गत‎ शहरातील पोलिस ठाणे, तहसील‎ कार्यालय, सार्वजनिक बांधकाम‎ विभाग , ग्रामीण रुग्णालय,‎ नगरपालिका कार्यालय परिसर,‎ पंचायत समिती कार्यालयाचे आवार,‎ बसस्थानक आणि शहरातील मुख्य‎ रस्त्यावर श्री सेवकांनी सकाळी‎ एकत्र येत स्वच्छता अभियान‎ राबवले. सर्व परिसर स्वच्छ करून‎ ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणावर कचरा‎ संकलन करून शहराच्या बाहेर‎ असलेल्या नगरपालिकेच्या कचरा‎ डेपोमध्ये टाकण्यात आला.‎