बेंगळुरु : आरसीबीच्या 11 चाहत्यांचा बेंगळुरुतील चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी आरसबीची संघाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

आरसीबीच्या खेळाडूंना आयपीएल ट्रॉफी पाहण्यासाठी चाहत्यांनी जोरदार गर्दी केली. त्यानंतर बेंगळुरुच्या च़िन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीचे खेळाडू येणार असल्याचे समजले आणि त्यानंतर चाहते तिथेही धावले. त्यावेळी एवढा मोठ्या प्रमाणात चाहते दाखल झाले होते की, पोलिसांना नेमकं काय करायचं हे समजलं नाही. कारण चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ही 35 हजार लोकांची आहे. पण त्यावेळी जवळपास 2-3 लाख लोकं जमली होती त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज केला आणि त्यानंतर जोरदार चेंगराचेंगरी झाली.
कर्नाटक हायकोर्टाने तेथील पोलिसांना याबाबत आपला अहवाल सादर करण्यास सांगितला. त्यानंतर येथील कबन पार्क पोलिसांनी आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात कबल पार्क पोलिसांनी आरसीबीची फ्रँचायझी, कर्नाटक क्रिकेट संघटना आणि डीएनए एंटरटेंनमेंट वर्क्स यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. कारण या तिन्ही पक्षकारांकडून मोठी चूक घडली आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे आता पोलिसांनी हायकोर्टात दाखवून दिले आहे. कारण आरसीबीचे एवढे चाहते स्टेडियमच्या इथे आले तरी कसे, या प्रश्नाचे उत्तर आता आरसीबीच्या फ्रँचायझीला द्यावे लागणार आहे. या दुर्घटनेत बरीच लोकं होती आणि त्यांच्यासाठी हे प्रकरण महत्वाचे आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रकिया लवकर केली जाईल, असे म्हटले जात आहे.


