कोरोना व्हायरस च्या परिस्थितीत आरपीएफ बलाच्या योद्ध्याचा लढा ; आवश्यक वस्तूंच्या वाहतूक सेवेसह मदत कार्यात योगदान ; माल वाहतूक संरक्षणासाठी अहोरात्र कार्यरत ;

मुंबई –
मध्य रेल्वेचे रेल्वे संरक्षण बल कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सातत्याने झुंज देत आहे. अत्यावश्यक आस्थापने, मालमत्ता आणि इतर रेल्वे मालमत्तांचे संरक्षण करण्याशिवाय रेल्वेचे अधिकारी, वैद्यकीय विभाग, राज्य पोलिस आणि नागरी प्रशासनाबरोबर खांद्याला खांदा लावून कार्य करीत असून ते आघाडीवर आहेत. एवढेच नव्हे तर ते कोविड -१९ चा मुकाबला करण्यासाठी सॅनिटायझर्सचे व मास्क यांच्या उत्पादनासह जागरूकता मोहीम, अन्न वितरण अशा अत्यंत आवश्यक कामातही मोठे योगदान देत आहेत.
लॉकडाऊन दरम्यान कोच, लोकोमोटिव्ह्ज, स्टॅबल्ड रॅक, यार्ड्स, सिग्नलिंग इन्फ्रास्ट्रक्चर, स्टेशन, रिले रूम, वस्तूंचे शेड, वॅगन स्टॉक इत्यादी संपत्तीचे संरक्षण ते वापरात असो किंवा नसो त्याचे संरक्षण करीत आहे. सर्व चल व अचल मालमत्तेवर 24x 7 सतत लक्ष ठेवून आहेत.
रेल्वेने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे धोरण म्हणून प्रवाशांच्या सेवेची वाहतूक थांबवली आहे परंतु आवश्यक वस्तूंची वाहतूक करण्यासाठी मालगाड्या चालवण्यात येत आहेत. देशभरातील औषधांसह, वस्तूंची शृंखला सुनिश्चित करण्यासाठी अजूनही अखंडित पुरवठा केला जात आहे.
आरपीएफ अधिका-यांसाठी या लॉकडाऊन दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता, वस्तू, पार्सल, आवश्यक वस्तूंचे संरक्षण करणे आणि त्यांची सुरक्षा करणे हे एक आव्हान आहे. तथापि, या कठीण काळात मध्य रेल्वेची महत्त्वपूर्ण भूमिका समजून घेत, बरेच कर्मचारी शांतपणे या कठीण परिस्थितीत धैर्याने काम करीत आहेत. प्रत्येक वस्तू तसेच पार्सल गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जाण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांद्वारे संरक्षित केलेल्या असतात.
एन. एस. राठोड, हेड कॉन्स्टेबल आणि कमांडंट आर. के. सैनी, आरपीएफ हे या लॉकडाऊनच्या वेळी कार्यरत योद्ध्यांपैकी आहेत. या कठीण काळात आवश्यक वस्तू आणि औषधांची सहज वाहतूक सुनिश्चित करत आहेत. श्री. राठोड छत्रपती शिवाजी महाराज स्थानक येथून लोणावळ्याला विशेष पार्सल गाड्यांना संरक्षित करत घेऊन गेले आणि परत येताना दुस-या पार्सल विशेष गाडीला पहारा देत आले. तसेच श्री सैनी यांनी विशेष पार्सल गाड्यांची सुरक्षा नाशिक पर्यंत व परत येताना केली. लॉकडाउनच्या वेळी, या योद्ध्यांनी ते पुन्हा आपल्या निवासी बॅरेक्सवर परत कधी येतील हे ठाऊक नसताना सामान्य कामाच्या तासांशिवाय अनेक तास व्यतीत केले. त्यांची कुटुंबे मूळ गावी ठेवून कोट्यावधी नागरिकांपर्यंत आवश्यक गोष्टी पोचविण्यास संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याने त्यांना कोविड -१९ विरुद्ध लढणारा योद्धा बनवते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *