तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन ;

जळगाव (जिमाका) दि. 12 –

हतनूर धरणाचे चार दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून आज दि. 12 जून रोजी सकाळी 11 वाजता तापी नदीपात्रात 5509 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.

तरी हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन हतनूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. महाजन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *