भुसावळ (प्रतिनिधी )-

पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी भुसावळ नगरपालिकेस कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तरी देखील शहरात कामे होत नसून, विकास काम केले नाही, तर याद राखा असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळच्या सभेत दिला होता. त्याअनुषंगाने भुसावळ मध्यवर्ती शिवसेना कार्यालयातर्फे शिवसेना पदाधिकार्यांची शिष्टमंडळ आज मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना भेटले. या बैठकीत त्यांनी नागरिकांच्या मूलभूत सेवा तातडीने सोडविण्याच्या संदर्भात चर्चा केली. त्यात नागरिकांच्या मूलभूत सेवा तातडीने मार्गी लावणार जनतेचे प्रलंबित प्रश्न जलद गतीने सोडवणार असे ठोस आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.
शहरातील यावल रस्त्याचे काम त्वरित सुरू केल्याबद्दल पालकमंत्र्यांचे व नगरपालिका प्रशासनाचे अभिनंदन या बैठकीत करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र समन्वयक रविंद्रजी मिर्लेकर, संपर्क प्रमुख विलास जि पारकर, जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाप्रमुख समाधान महाजन यांच्या सहकार्याने या बैठकीचे नियोजन करण्यात आले. यात विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. अनेक दिवसांपासून नाट्यप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सुसज्ज नाट्यगृह ते साकार करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून सोमानी गार्डनच्या जवळ जागा देण्याचे त्यांनी मान्य केले. सिग्नलची अत्याधुनिक यंत्रणा लवकरच कार्यान्वित करणार आहे असे सांगितले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी क्रीडा संकुल ताब्यात घेऊन ते लवकरच सुरू करणार आहे. पालकमंत्र्यांनी दिलेला कोट्यावधीचा निधी खर्च करून भुसावळमध्ये रस्त्यांचा प्रश्न आरोग्य, पाणी पुरवठा, स्वच्छता हे विषय मार्गी लावले जातील. कोणताही निधी परत जाऊ दिला जाणार नाही असे ठासून सांगितले. छोटे व्यवसायिक आणि अतिक्रमणधारकांसाठी आठवडे बाजारात हॉकर्स झोन तयार करून त्यांना पर्यायी जागा दिली जाणार असल्याचे देखील त्यांनी याप्रसंगी सांगितले. घनकचरा विल्हेवाटीसाठी आयटीआय जवळ चोरवड सब स्टेशनच्या मागे जागा निश्चित केली जाणार असल्याची माहिती दिली. भुसावळ चा रिंग रोड जमीन अधिग्रहणाचा प्रश्न नगररचना विभागाकडून मार्गे लावला जाणार आहे. अमृत योजना पूर्णत्वास येण्यासाठी अजून सुमारे दोन ते अडीच वर्षे लागणार असल्याने आता अस्तित्वात असलेली पाणी पाणीपुरवठा योजना वेळेवर चार ते पाच कोटी रुपये खर्चून लोकांना मुबलक पाणीपुरवठा केला जाईल असे सांगितले. नगरपालिकेची पाणीपट्टी वसूल करण्यासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जाणार नाही जे मोठे मोठे थकबाकीदार आहेत सुमारे आठ ते दहा वर्षांपासून त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करून नपा ची वसुली वाढवली जाणार आहे त्यातून विविध विकास कामांना गती देण्यात येईल यापुढे शहरात नगरपालिकेची अधिकृत परवानगी घेऊन रीतसर किरकोळ वसुलीचे पैसे भरल्याशिवाय कोणतेही ब्लॅकबोर्ड लावू दिले जाणार नाही या सर्व मागण्या यांनी मान्य केल्या याप्रसंगी पदार्थ या पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाला पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य मिळवण्यासाठी आम्ही स्थानिक पदाधिकारी पाठपुरावा करू व सहाय्य करू असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिले चर्चेच्या प्रसंगी रावेर लोकसभा मतदार संघाचे जिल्हा संघटक विलास मुळे उपजिल्हाप्रमुख एडवोकेट काम श्रीगोंदेकर यांनी चर्चेत भाग घेतला उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक उत्तम सुरवाडे यांनी प्रलंबित प्रश्नांची मांडणी शिष्टमंडळासमवेत याप्रसंगी मुख्य अधिकाऱ्यांसमोर केली विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे शहर प्रमुख नीलेश महाजन शहर प्रमुख बबलू मराठे जग्गू खेराडे योगेश बागुल यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत असे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीप्रमुख गोकुळ बाविस्कर यांनी कळविले आहे.



