भुसावळ(प्रतिनिधी ) – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत हिंदुत्वाला मिळालेल्या यशामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भुसावळ येथील ‘श्री राधाकृष्ण प्रभात फेरी’च्या वतीने मंगळवारी एक आगळावेगळा विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रभात फेरीत सहभागी सर्व भक्तांना पश्चिम बंगालचा प्रसिद्ध खाद्यपदार्थ ‘झाल मुरी’ प्रसादाचे वाटप करण्यात आले. या जल्लोषादरम्यान कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. या कार्यक्रमाचे आयोजन श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.याप्रसंगी श्याम काबरा,विनोद जोशी,संजय अग्रवाल,संतोष नागला,श्याम अग्रवाल,जे.बी.कोटेचा,मदनलाल जांगिड,अनुप अग्रवाल,अर्जुन पटेल,सत्यनारायण शर्मा,सुरेश काबरा,रमाकांत मंत्री,सुनील लाहोटी,दीपक अगिवाल,किरण कोल्हे,संजय फालक,मदन बोरकर,जी.आर.ठाकूर,राजू जयस्वाल,गोपाल तिवारी,अनिल अग्रवाल,हेमंत जगताप,महेश पाटील,संतलाल द्विवेदी,रामकृष्ण पाटील,पिंटू हेडा,विनोद राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळ येथे मंगळवारी पहाटे श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे झाल मुरी या प्रसादाचे वाटप करण्यात आले त्यावेळी उपस्थित राधेश्याम लाहोटी,श्याम काबरा,विनोद जोशी,संजय अग्रवाल,संतोष नागला,शाम अग्रवाल व इतर भावीक.


