नागरिकांना प्रत्येकी ५ किलो तांदूळ मिळणार ; तहसीलदार दिपक धिवरे

भुसावळ (प्रतिनिधी)-
कोरोना विषारी वायुच्या प्रादुर्भाव रोखण्याकरीता भारतात लोकडाउन सुरुं आहे.यामुळे हातावर पोट असणाऱ्या शहरातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानावरती दिनांक 10 ते 15 तारखेच्या जवळपास प्रत्येकी (मानसी) 5 किलो तांदूळ वाटप करण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ फक्त अंत्योदय लाभार्थी नागरिकांना मिळणार आहे. त्यांना स्वस्थ धान्य दुकानावर धान्य मिळत आहे.बाकी नागरिकांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे. दिनांक 10 ते 15 एप्रिलच्या जवळपास रेशनिग दुकानावरती प्रत्येकी 5 किलो तांदूळ दिले जाणार आहे.भुसावळतील नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.अशी माहिती तहसीलदार दिपक धिवरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *