भुसावळ – (प्रतिनिधी )- निर्भया प्रकरणांमध्ये एकच म्हणावसं वाटतं जे घडलं ते उशिरा घडलं त्या चारही नराधमांना फाशी मिळाली हा न्यायव्यवस्थेचा व आपल्या समाजाचा विजय आहे ज्या महिलांनी हे प्रकरण उचलून धरलं ज्या वाहिन्यांनी हे प्रकरण उचलून धरलं त्याच्या परिश्रमामुळे या चार लोकांना फाशीची शिक्षा मिळाली यापुढे निर्भया सारखं प्रकरण घडू नये याच्यासाठी समाजानेही त्या स्वरूपाची पावले उचलणे गरजेचे आहे असे मत अॕड दिलीप पंडित यांनी व्यक्त केले.

