मध्य रेल्वेने महाकुंभाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले – ३.८५ लाख भाविकांनी प्रवास केला

मध्य रेल्वेने महाकुंभ-२०२५ च्या भव्य यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुव्यवस्थित आणि विस्तृत रेल्वे सेवा नेटवर्कमुळे, जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मंडळांपैकी एक असलेल्या महाकुंभ-२०२५ दरम्यान प्रयागराज येथे पवित्र स्नान करण्यासाठी ३.८५ लाखांहून अधिक भाविकांना आरामात प्रवास करता आला आहे.

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात देशभरातील यात्रेकरूंची मोठी गर्दी झाली होती आणि त्यांचा प्रवास सुलभ करण्यात भारतीय रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली. मध्य रेल्वेने या आध्यात्मिक मेळाव्यादरम्यान रेल्वे वाहतुकीचा मोठा भाग चालवला होता, ज्यामुळे भाविकांना प्रयागराज आणि जवळच्या शहरांच्या पवित्र भूमीवर सहज आणि आरामात पोहचण्यास मदत झाली. १७,००० पेक्षा अधिक रेल्वे प्रवासांचा विक्रमी अनुभव घेऊन, भारतीय रेल्वेने विविध ठिकाणांहून भाविकांना प्रयागराज आणि आसपासच्या भागात पोहचवण्यात आणि परत आणण्यात आणि महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

कुंभमेळ्यातील भाविकांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी मध्य रेल्वेने एकट्या मुंबईहून एकूण ८२३ रेल्वे सेवा चालवल्या, ज्यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून ७०८ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून ११५ रेल्वे सेवांचा समावेश आहे.

पुण्याने ६ विशेष गाड्यांसह १०२ रेल्वे सेवा सुरू करून महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर नागपूरने ६ विशेष गाड्यांसह २२५ रेल्वे सेवा चालवल्या. महाकुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांना सुरळीत आणि वेळेवर प्रवास करता यावा यासाठी या गाड्या काळजीपूर्वक नियोजित आणि चालवल्या गेल्या. मध्य रेल्वेने महाकुंभ-२०२५ साठी भाविकांना सुविधा पुरवली आणि विविध स्थानकांवर ६७९३ हून अधिक गाड्या थांबल्या. मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरून जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून आली:

  • ठाणे येथे ३८३ गाड्या थांबल्या
    • कल्याण येथे ६८७ गाड्या थांबल्या
  • भुसावळ येथे ७२३ गाड्या थांबल्या
    • नाशिक येथे ६०१ गाड्या थांबल्या
  • मनमाड येथे ५३७ गाड्या थांबल्या
  • बैतुल येथे १३८ गाड्या थांबल्या

मध्य रेल्वेने यात्रेकरूंना सुरक्षित, आरामदायी आणि त्रासमुक्त प्रवास देण्यासाठी व्यापक उपाययोजना केल्या. महाकुंभाचे नियोजन कार्यक्रमाच्या खूप आधीपासून सुरू झाले होते, विशेष पर्वणी व शुभ दिवसांवर रेल्वे प्रवासाच्या विशिष्ट मागण्यांकडे विशेष लक्ष दिले गेले होते. गर्दी लक्षात घेऊन , अतिरिक्त गाड्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचे नियमितपणे निरीक्षण केले जात होते, जे चोवीस तास सतर्क होते. विविध स्थानकांमधील सीसीटीव्ही फुटेजमुळे सर्व पैलूंवर बारकाईने लक्ष ठेवले गेले. काळजीपूर्वक नियोजन, समन्वय आणि अथक प्रयत्नांद्वारे महाकुंभ २०२५ साठी यात्रेकरूंच्या यशस्वी वाहतुकीत मध्य रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केलेल्या प्रयत्नांमुळे भाविकांना प्रयागराजला जाण्यासाठी आणि तेथून सुरक्षित, आरामदायी आणि कार्यक्षम प्रवास मिळाला, ज्यामुळे या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या एकूण यशात मोठा वाटा मिळाला.