भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके द्वारा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मार्फत होणारा कर्जपुरवठा हा अत्यल्प स्वरूपाचा असल्याने मागील वर्षी प्रमाणे शंभर टक्के कर्ज पुरवठा करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भुसावळ तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगाव यांना
देण्यात आले .
प्रसंगी भुसावळ शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन सर व शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे हे उपस्थित होते . जिल्हाधिकारी जळगाव यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजीव पाटील यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ डी डी आर यांना सूचना केल्या व शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकेला सूचित करावे असे आदेशित केले .



