भुसावळ (प्रतिनिधी)
येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर एन.आर.सी.व सी.ए.ए.कायदया विरोधात गेल्या २५ दिवसापासून येथील संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरु आहे . गुरुवार दिनांक १३ रोजी या उपोषणा दरम्यान आंदोलन कर्त्यानी शासनाचे लक्ष वेधण्याकरीता गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गानुसार आंदोलन सुरु केले आहे . या अनुषंगाने गांधी यांच्या शिकवणी नुसार ‘बुरा मत देखो , बुरा मत बोलो ,बुरा मत सुनो या तत्वां नुसार गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
उपोषणकर्त्यानी यावेळी कांन , डोळे, व तोंड बंद करुन आंदोलन केले .
केंद्र सरकार लवकरच एन.आर.सी.सी.ए.ए.कायदा रद्द करावा तो अंमलात आणू नये ही मागणी करीत या काळया कायदयाचे विरोधात भुसावळ तहसील कार्यालयाच्या बाहेर २५ दिवसापासून उपोषण सुरु आहे .
यावेळी समितीचे अध्यक्ष हाजी सलीमसेठ चुडीवाले,माजी नगरसेवक हाजी साबीर शेख,मो.मुनव्वर खान, शेख पापा ,दानिश पटेल, यूनुस मामा , अजहर मजहर, अशरफ कुरेशी , हाजी सलीम पिंजारी, मौलाना अनीश फरान इलेक्ट्रिकल्स, अब्दुल रहीम कुरेशी , जुनेद खान, सयैद शहजाद, नजीर, वासिफ, रउफ ठेकेदार , पठान, वासिफ सयैद , मोहम्मद आबिद, डॉ इमरान यांच्यासह संविधान बचाव नागरी कृती समिती पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच नागरिक व मुस्लिम बांधव उपस्थित होते .



